मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात “१०० दिवसीय नियोजन आराखडा” या अंतर्गत महत्त्वाची बैठक संपन्न झाली. या बैठकीत माहिती व तंत्रज्ञान, नगर विकास-२, उद्योग, कामगार, तसेच मृद व जलसंधारण विभागांच्या योजनांचा सखोल आढावा घेण्यात आला.
ही बैठक दु. १२.३० वाजता मंत्रालय, मुंबई येथे पार पडली. यावेळी संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी व प्रमुख सचिव उपस्थित होते. या बैठकीत १०० दिवसांत प्रभावी अंमलबजावणीसाठी शाश्वत योजनांची आखणी करण्यात आली.
महत्त्वाचे मुद्दे:
-
माहिती व तंत्रज्ञान: तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शासनाच्या विविध योजना जनतेपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याचा दृष्टिकोन.
-
नगर विकास-२: स्मार्ट सिटी प्रकल्प, शहरी पायाभूत सुविधा, आणि नव्या गृहनिर्माण धोरणांवर चर्चा.
-
उद्योग: गुंतवणूकदारांना प्रोत्साहन देण्यासाठी नवीन धोरणांची आखणी, उद्योग क्षेत्राचा विकास, आणि रोजगार निर्मितीच्या संधी.
-
कामगार: कामगार कल्याण योजनांचे प्रभावी अंमलबजावणीचे नियोजन.
-
मृद व जलसंधारण: जलसंधारणासाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना, तसेच शेतीसाठी जलसाठ्यांचे नियोजन.





