Home Breaking News तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर! 132 वर्षांचा विक्रमी पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान,...

तेल्हारा तालुक्यात अतिवृष्टीचा कहर! 132 वर्षांचा विक्रमी पाऊस; शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान, प्रहार जनशक्ती पक्षाचे आंदोलनाचा इशारा

42
0

तेल्हारा (जि. अकोला), ३० मे २०२५ – तेल्हारा तालुक्यात तब्बल 132 वर्षांचा विक्रम मोडणाऱ्या पावसाने थैमान घातले असून शेतकऱ्यांचे जीवघेणे नुकसान झाले आहे. उडीद, मूग, भुईमूग, केळी, तीळ, जवारी यांसारख्या पिकांचे प्रचंड प्रमाणावर नुकसान झाले आहे. विशेषतः भुईमूग व जवारी पिकांना कोंब फुटल्याने शेतकरी अक्षरशः उध्वस्त झाले आहेत. एकीकडे निसर्गाची साथ नाही आणि दुसरीकडे शासनाच्या मदतीचा पत्ता नाही, अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.

या संकटाच्या पार्श्वभूमीवर, प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने शेतकऱ्यांच्या न्यायासाठी तेल्हारा तहसील कार्यालयावर निवेदन देण्यात आले. नायब तहसीलदार राणे साहेब यांना निवेदन सादर करून शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन तत्काळ पंचनामे करण्याची व मदतीचा प्रस्ताव शासन दरबारी सादर करण्याची मागणी करण्यात आली.

या निवेदनावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे, जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु, महासचिव राजेश पाटील खारोडे, तालुका शेतकरी अध्यक्ष गोपाल घुगड, युवक उपजिल्हाप्रमुख सूरज भैय्या खारोडे, शहर प्रमुख विकी मल, तसेच प्रहारचे सर्व सेवक व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

राज्य शासनाने शेतकऱ्यांना कर्जमुक्तीचा शब्द दिला होता, पण अद्यापही अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळालेला नाही. “अशा स्थितीत शेतकऱ्यांचा वाली कोण? शेतकऱ्यांना वेळेत मदत न दिल्यास प्रहार जनशक्ती पक्ष तीव्र आंदोलन छेडेल,” असा तीव्र इशाराही जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे यांनी यावेळी दिला.

🔹 महत्त्वाचे मुद्दे :

  • 132 वर्षांचा विक्रमी पाऊस व अतिवृष्टीचा फटका

  • शेतकऱ्यांचे हजारो हेक्टरवरील पीक नुकसान

  • शासनाकडून वेळेवर मदत न मिळाल्यामुळे शेतकरी संकटात

  • पंचनामे करून त्वरित आर्थिक मदत देण्याची मागणी

  • प्रहार जनशक्ती पक्षाचा आक्रमक पवित्रा

निवेदन देणाऱ्यांमध्ये उपस्थित प्रमुख कार्यकर्ते:

उमेश कोरडे, संतोष गिरे, प्रदीप पाथ्रीकर, शिवाजी जोध, संदीप ताथोड, श्याम बोर्डे, ऋषिकेश जायले, उदित सैनी, ज्ञानदेव खडसे, विष्णू खडसे, विशाल बघ्घन, रणवीर काकडे, भूषण झवर, स्वप्निल कोरडे, शिवाजी कोरडे, शुभम मोहोड, अमित इंगळे, कार्तिक इंगळे, शेख शारिक, प्रशांत बाभुळकर, ऋषिकेश खारोडे, दत्ता मोडक, रोहित खोपाळे, विनोद खडसे, भानुदास जोध आदींची उपस्थिती लक्षणीय ठरली.