Home Breaking News लोणावळा नगरपरिषदेत अंदाधुंद कारभार – SIT चौकशीची मागणी!

लोणावळा नगरपरिषदेत अंदाधुंद कारभार – SIT चौकशीची मागणी!

186
0

लोणावळा नगरपरिषद बरखास्त झाल्यापासून प्रशासनाच्या मनमानी कारभाराने नागरिकांचे हाल सुरूच आहेत. स्थानिक नागरिकांच्या अडचणी सोडविण्याऐवजी अधिकारी फक्त पैशाच्या जोरावर मोठ्या व्यक्तींची कामे करत असल्याचा आरोप होत आहे.

नगरपरिषदेतील अधिकाऱ्यांचा मनमानी कारभार

लोणावळा नगरपरिषदेमध्ये कार्यरत असलेल्या एटीपी अतुल केंद्रे व कदम हे फक्त धनाढ्य आणि बिल्डर लोकांचेच काम करतात, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. सामान्य नागरिकांनी कितीही अर्ज केले तरी त्यांच्याकडे दुर्लक्ष केले जाते. परंतु, जे पैसे देतात त्यांचे बांधकाम परवानगी, प्लिंथ चेकिंग व कंप्लीशन सर्टिफिकेट तत्काळ दिले जाते. त्यामुळेच काहींची घरे अगदी नाल्यावर येत असली तरीही त्यांना बेकायदेशीरपणे परवानगी देण्यात येते.

मुख्याधिकारी अशोक साबळे यांची भूमिका संशयास्पद?

मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्याकडे अनेक तक्रारी घेऊनही नागरिकांना कोणतीही मदत मिळत नाही. त्यामुळे अधिकारी आणि मुख्याधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

स्वतःला आलेले अनुभव सांगत महेश गोपाळ केदारी यांची तक्रार

शिवसेना जिल्हा संपर्कप्रमुख महेश गोपाळ केदारी यांनी सांगितले की, “मी स्वतः १२ फेब्रुवारी २०२५ रोजी प्लिंथ चेकिंगसाठी अर्ज केला होता. मात्र, ८ ते १० वेळा नगरपरिषदेत जाऊनही कोणीही पाहणीसाठी आले नाही. तसेच, माझे बंधू मंगेश गोपाळ केदारी यांनी गेल्या वर्षभरापासून कंप्लीशन सर्टिफिकेटसाठी पाठपुरावा केला, पण आजपर्यंत त्यांना काहीच उत्तर मिळाले नाही.”

नगरपालिकेच्या मालकीच्या जागांचा गैरवापर

नगरपालिकेच्या मालकीच्या जागा, गार्डन इत्यादी मोठ्या व्यावसायिकांना दिल्या जात आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार होत असल्याचा संशय आहे. सामान्य नागरिकांना कुठल्याही प्रकारची सुविधा मिळत नसून, फक्त श्रीमंत लोकांचेच प्रकरणे निकाली काढली जात आहेत.

SIT चौकशीची मागणी

या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) स्थापन करून कारवाई करण्यात यावी, अशी मागणी महेश गोपाळ केदारी यांनी मुख्यमंत्री आणि नगरविकास मंत्र्यांकडे केली आहे.