Home Breaking News वडगाव मावळमध्ये ‘जनता दरबार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार सुनील शेळके यांनी जनतेच्या अडचणींना...

वडगाव मावळमध्ये ‘जनता दरबार’ला उत्स्फूर्त प्रतिसाद; आमदार सुनील शेळके यांनी जनतेच्या अडचणींना दिले तात्काळ उत्तर

99
0

मावळ विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सुनील शेळके यांनी पुन्हा एकदा आपल्या जनता दरबार उपक्रमातून जनतेशी थेट संवाद साधत लोकशाहीचे खरी मूल्य जपले आहे. वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहाच्या प्रांगणात नुकताच संपन्न झालेला हा दरबार, नागरिकांच्या भरघोस उपस्थितीमुळे यशस्वी ठरला.

गेल्या साडेपाच वर्षांपासून दर सोमवारी नियमितपणे होणाऱ्या या उपक्रमाला स्थानिक नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत आहे. यावेळी अनेक नागरिकांनी आपापल्या समस्या मांडल्या – ज्यामध्ये पाणीपुरवठा, रस्त्यांची खराब अवस्था, आरोग्य व शिक्षण क्षेत्रातील अडचणी, शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी यांचा समावेश होता.

आमदार शेळके यांनी नागरिकांच्या समस्या अत्यंत संयमाने आणि समजूतदारपणे ऐकून घेतल्या. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना थेट सूचना देऊन तुरित कार्यवाहीचे निर्देश दिले. अनेक प्रलंबित प्रकरणांमध्ये ठोस निर्णय घेण्यात आला.

या दरबारात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष गणेश खांडगे, महिला तालुकाध्यक्ष दीपाली गराडे, तसेच दीपक हुलावळे, साहेबराव कारके, काळूराम मालपोटे, पंढरीनाथ ढोरे, नारायण ठाकर, नारायण भालेराव, भरत येवले, सुहास गरुड, चंद्रकांत दाभाडे, किशोर सातकर यांसारखे पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांच्या तक्रारींची नोंद घेत, संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांशी समन्वय साधून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले.

यावेळी बोलताना आमदार शेळके म्हणाले, “लोकप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी केवळ सभागृहात बोलण्यात नाही, तर जनतेमध्ये राहून त्यांच्या अडचणी समजून घेणे आणि त्यांचे त्वरित निराकरण करणे हे माझे खरे काम आहे. जनता दरबार उपक्रमातून मी हेच करत आहे.”

वडगाव व परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने हजेरी लावून आपल्या अडचणी मांडल्या. त्यामुळे जनता दरबार उपक्रम हा फक्त तक्रार निवारणाचे नव्हे, तर लोकांशी विश्वासाने संवाद साधण्याचे प्रभावी माध्यम ठरतो आहे.

आमदार शेळके यांची लोकाभिमुख कार्यपद्धती, संयमी आणि तत्पर प्रतिसाद, आणि प्रशासनावर प्रभावी दबाव या त्रिसूत्रीमुळे मावळ मतदारसंघात नागरिकांमध्ये समाधान आणि विश्वास निर्माण झाला आहे.