“शेतकरी हा देशाचा पोशिंदा आहे. मात्र आज त्याची अवस्था बिकट झाली आहे. मोदी सरकारने २०१४ साली दिलेली १६ महत्त्वाची आश्वासने कोणी पाळली का?” असा थेट सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित केला आहे.
यवतमाळच्या दाभडी गावातून ‘शेतकरी सन्मान पदयात्रा’ काँग्रेसच्या नेतृत्वाखाली मोठ्या उत्साहात सुरू झाली असून, ही यात्रा मुंबईमार्गे दिल्लीपर्यंत नेण्यात येणार आहे. या यात्रेचा उद्देश म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०१४ मध्ये दिलेली आश्वासने व त्यांची आजची वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
“कर्जमाफी, हमीभाव, १५ लाख रुपये, २ कोटी रोजगार, शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट…” या घोषणांचा कोठे आहे अंमल?
“हरभरा, तूर, सोयाबीन, कांदा यांना कवडीमोल दर; शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू.”
“सोयाबीनचे तेल ₹१६५, पण शेतकऱ्याला फक्त ₹३५–₹४० किलोला दर!”
“शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट झाले नाही, उलट कर्जबाजारीपणा वाढला.”
“मधला मलिदा अदानी खातोय!”
भाजपावर घणाघात
हर्षवर्धन सपकाळांनी ‘हर घर तिरंगा’ अभियानालाही लक्ष्य करत सांगितले की, “तिरंगा पॉलिस्टरचा आणि तोसुद्धा चीनमधून मागवलेला!” हे देशभक्तीचे नाही, दलालीचे लक्षण आहे.
भाजपाचं सरकार हे फक्त अदानी-अंबानी यांच्यासाठी काम करत आहे. शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार तरुण हे या सरकारच्या अजेंड्यावरच नाहीत.
पदयात्रेचा भव्य शुभारंभ
यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथील ओंकारेश्वर मंदिर येथून यात्रेची सुरुवात झाली. सुरुवातीपूर्वी सपकाळांनी पोहरादेवीचे दर्शन घेऊन आशीर्वाद मागितले. यात्रा कृषी उत्पन्न बाजार समिती येथे सभेने संपन्न झाली.
जिल्ह्यातील जनतेचा मोठा प्रतिसाद
या पदयात्रेत सहभागी झालेले नेते:
माजी मंत्री शिवाजीराव मोघे
माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे
काँग्रेस कार्यकारणी सदस्य व खासदार प्रणिती शिंदे
खासदार प्रभात धानोरकर
माजी मंत्री अनिस अहमद, वसंत पुरके
आमदार राजेश राठोड, अनिल मांगुळकर
प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी
जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल मानकर, सचिन नाईक
तसेच हजारो शेतकरी, महिला व तरुण कार्यकर्ते
माणिकराव ठाकरे – “मोदी सरकारच्या खोट्या जाहिरातींना लोक कंटाळले आहेत.”
शिवाजीराव मोघे – “देशात आर्थिक विषमता वाढली, शेतकरी मात्र पुन्हा तोंडात माती घालून जगतोय.” प्रणिती शिंदे – “भाजपा सरकारला आता शेतकऱ्यांचा धसका घ्यावा लागेल.” शेतकऱ्यांचा लढा आता दिल्लीच्या दारात “आज आवाज दिला नाही तर उद्या परिस्थिती हाताबाहेर जाईल,” असे सांगून सपकाळांनी सर्व शेतकरी संघटनांना या लढ्यात सामील
होण्याचे आवाहन केले.
मुख्य मुद्दे – मोदींच्या १६ अपूर्ण आश्वासनांची यादी
उत्पन्न दुप्पट
कर्जमाफी
उत्पादन खर्चावर दीडपट हमीभाव
खात्यात ₹१५ लाख
२ कोटी रोजगार दरवर्षी
PM फसल बीमा योजनेची शाश्वती
शेततळ्यांसाठी अनुदान
MSP चा कायदेशीर दर्जा
ग्रामीण आरोग्य सुविधा