राज्यातील पोलिस दलातील कार्यक्षमतेचा गौरव करत, केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२२ सालासाठी महाराष्ट्रातील अकरा पोलिस अधिकाऱ्यांना ‘केंद्रीय गृहमंत्री उत्कृष्ट अन्वेषण पदक’ प्रदान केले. हा सन्मान त्यांच्या अतुलनीय, काटेकोर आणि तांत्रिकदृष्ट्या अचूक अशा गुन्हे तपासासाठी देण्यात आला.
हा पदक वितरण समारंभ पुणे येथील पोलिस संशोधन केंद्रात पार पडला. या कार्यक्रमाला राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्यासह गुन्हे अन्वेषण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि पदक विजेते अधिकारी उपस्थित होते. या पुरस्कारामुळे महाराष्ट्र पोलिस दलाचा सन्मान वृद्धिंगत झाला आहे.
कार्यक्रमात रश्मी शुक्ला यांनी आपल्या भाषणात सांगितले, “या अधिकाऱ्यांनी अत्यंत गुंतागुंतीच्या गुन्ह्यांचा तपास तांत्रिक कौशल्य, चिकाटी आणि संयमाने केला असून हे संपूर्ण देशातील पोलिस यंत्रणेसाठी आदर्श आहे.”
📍 निवडक तपासांची ठळक वैशिष्ट्ये:
पोलीस अधिकारी
१) कृष्णकांत उपाध्याय, पोलीस उपायुक्त, मुंबई शहर
२) प्रमोद भास्करराव तोरडमल, वरिष्ठ पोलीस निरीक्षक कुर्ला पोलीस ठाणे
३) मनोज मोहन पवार, सहायक पोलीस निरीक्षक, मंद्रुप पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण
११) समीर सुरेश अहिरराव, पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा कक्ष २, मिरा भाईंदर, वसई विरार
महाराष्ट्र पोलिस दलाचे भविष्य उज्ज्वल!
२०१८ पासून आजपर्यंत राज्यातील एकूण ५४ अधिकाऱ्यांना हे पदक मिळाले आहे. यामध्ये यंदाच्या ११ अधिकाऱ्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस यंत्रणेचा गौरव उंचावला आहे. अशा पोलीस अधिकाऱ्यांनी देशातील गुन्हेगारी रोखण्यासाठी नवे मापदंड निर्माण केले आहेत.