Home Breaking News भूमिपुत्रांच्या एकतेचा विजय! चार्होळीतील टीपी स्कीम अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व...

भूमिपुत्रांच्या एकतेचा विजय! चार्होळीतील टीपी स्कीम अखेर रद्द; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मनपा प्रशासनाची सकारात्मक भूमिका

60
0

पिंपरी-चिंचवड, चार्होळी (मौजे) गावातील प्रस्तावित टीपी (टाऊन प्लॅनिंग) स्कीम अखेर रद्द करण्यात आली आहे. ही भूमिपुत्रांच्या संघर्षाची आणि एकतेची ऐतिहासिक विजयगाथा ठरली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाने यामध्ये सकारात्मक भूमिका घेतली असून आयुक्त आणि प्रशासक श्री. शेखर सिंह यांनी टीपी स्कीमचा निर्णय सध्या स्थगित ठेवण्याचे आदेश दिले आहेत. लवकरच या निर्णयास महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजुरी दिली जाईल आणि अधिकृत अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.

“भूमिपुत्राच्या हक्कासाठी कुठलाही तडजोड होणार नाही!”

या निर्णयानंतर भाजप महायुतीचे नेते व माजी महापौर नितीन काळजे यांनी म्हटले की, “पिंपरी-चिंचवडमधील भूमिपुत्र हा माझ्या सामाजिक आणि राजकीय जीवनाचा केंद्रबिंदू राहिला आहे. भूमिपुत्राच्या हक्कासाठी कोणत्याही परिस्थितीत तडजोड केली जाणार नाही. चिखली आणि चार्होळी या दोन्ही गावांतील टीपी योजना रद्द झाल्या आहेत हे आमचं मोठं यश आहे.”

मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपामुळे यशस्वी लढा

या संदर्भात राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांनी महापालिका प्रशासनाला यावर योग्य निर्णय घेण्याचे निर्देश दिले होते. त्यांच्या हस्तक्षेपामुळेच भूमिपुत्रांच्या हिताचे हे लढे यशस्वी झाले आहेत. प्रशासनाने यानंतर त्वरीत टीपी स्कीम रद्द करण्याच्या दिशेने पावले उचलली.

महत्त्वाची बैठक महापालिकेत

या पार्श्वभूमीवर आज महापालिका भवनात मा. महापौर नितीन काळजे, सामाजिक कार्यकर्ते सचिन टापकीर, त्यांचे सहकारी आणि प्रशासकीय अधिकारी यांच्यात अंतिम चर्चा झाली. सर्व संबंधित पक्षांनी भूमिपुत्रांच्या न्याय्य मागण्या मान्य करत एकमताने टीपी स्कीम रद्द करण्याचे आश्वासन दिले.

‘बफर झोन’ आणि अधिकार वसुलीसाठी भाजप सरकारचे पाऊल

राज्य सरकारने यापूर्वीही भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करण्यासाठी ‘बफर झोन’ रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. भूमिपुत्रांना त्यांच्या हक्काचे न्याय मिळवून देण्यासाठी भाजप महायुती सरकारने सातत्याने सकारात्मक निर्णय घेतले आहेत.

प्रशासन व मुख्यमंत्री यांचे आभार

नितीन काळजे यांनी महापालिका प्रशासनाचे, विशेषतः आयुक्त शेखर सिंह यांचे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.