अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात गेल्या अनेक वर्षांपासून कार्यरत असलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाला नवीन बळ मिळालं आहे. माजी राज्यमंत्री व प्रहार संस्थापक अध्यक्ष वंदनीय बच्चुभाऊ कडू यांच्या चायता वर्गाचा ठसा असलेल्या या भागात, आज प्रहार जनशक्ती पक्षाची तालुका कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
ही नियुक्ती प्रहार राज्य कार्याध्यक्ष मा. बल्लूभाऊ जवंजाळ यांच्या आदेशानुसार तसेच जिल्हाध्यक्ष कुलदीप भाऊ वसू, जिल्हा महासचिव राजेश पाटील खारोडे, युवक जिल्हाध्यक्ष सुशील फुंडकर आणि युवक उपाध्यक्ष भैया खारोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
घोषित करण्यात आलेली प्रमुख पदाधिकारी नियुक्ती: तालुका अध्यक्ष – ज्ञानेश्वर आखरे शेतकरी आघाडी तालुका प्रमुख – गोपाल घुंगळ तालुका प्रसिद्ध प्रमुख – संतोष गिर्हे युवक तालुका उपाध्यक्ष – शिवा जोध युवक प्रहार सचिव – अमित इंगळे युवक प्रहार सर्कल प्रमुख – अनिकेत नेमाडे
या सर्वांना नियुक्तीपत्र देऊन औपचारिकरित्या नियुक्त करण्यात आलं. या कार्यकारिणीला जंबो कार्यकारणी म्हटलं जात असून, त्यामुळे तेल्हारा तालुक्यात उत्साहाचे व समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
शेतकरी आणि दिव्यांगांसाठी लढण्याची तयारी: नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, तेल्हारा तालुक्यातील शेतकरी, दिव्यांग व शेतमजुरांचे प्रलंबित प्रश्न शासन दरबारी मांडून त्यावर ठोस उपाययोजना करण्यात येणार आहेत.
अन्यायाविरुद्ध आवाज, सरकारी योजनांचा योग्य लाभ, शासन दरबारी मागण्या सोडवणे, तरुण वर्गाला सकारात्मक दिशेने मार्गदर्शन — या प्रमुख मुद्द्यांवर प्रहार कार्यकर्ते काम करत राहतील, असे वचन नवनियुक्त तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे आणि गोपाल घुंगळ यांनी दिले.
युवा वर्गाचा ओघ प्रहारकडे वळणार: युवक प्रहार संघटनेत अधिकाधिक सामाजिक बांधिलकी असलेला युवक वर्ग सामील व्हावा, यासाठी विचारवंत बच्चुभाऊंच्या विचारधारेचा प्रचार व प्रसार तेल्हारात जोरदारपणे केला जाईल. येत्या जिल्हा परिषद व नगरपालिका निवडणुकांमध्ये प्रहारचे कर्तबगार कार्यकर्ते विजयी होतील, यासाठी रणनीती आखली जाणार आहे.