इस्लामाबाद | ८ मे २०२५ :- भारताने मंगळवारी मध्यरात्री ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत पाकिस्तान व पाकिस्तान-व्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांवर सर्जिकल स्ट्राईक केला. या कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये एकच खळबळ उडाली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी मध्यरात्री देशवासीयांना उद्देशून भाषण करत भारताला थेट इशारा दिला – “भारताने रक्ताच्या प्रत्येक थेंबाची किंमत मोजावी लागेल!”
सीमेवर गोळीबार, भारतीय लष्कराचं तडाखेबंद प्रत्युत्तर
भारतीय कारवाईनंतर पाकिस्तानने सीमेवर अंधाधुंध गोळीबार करण्यास सुरुवात केली. मात्र भारतीय सैन्यानेही याचे तीव्र प्रत्युत्तर दिलं. ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला असून त्यांच्या मानसिकतेवर परिणाम झाला आहे. या कारवाईमध्ये २६ जणांचा मृत्यू झाला असून, ४० हून अधिक लोक जखमी झाल्याचा दावा शरीफ यांनी केला आहे.
“शेवटच्या श्वासापर्यंत लढू!” – शाहबाज शरीफ यांचा भावनिक पवित्रा
रात्री उशिरा केलेल्या भाषणात शाहबाज शरीफ यांनी आपल्या भावनिक उद्गारांनी देशवासीयांना झापलं. त्यांनी म्हटलं, “मी माझ्या देशाच्या सुरक्षेसाठी शेवटच्या श्वासापर्यंत लढणार आहे. भारताने आमच्यावर आक्रमण करून मोठी चूक केली आहे. आमचं सैन्य आणि नागरिक एकवटले असून आपण मागे हटणार नाही.”
ब्लॅकआऊटने पाकिस्तान झाकोळला – रात्रभर अंधार
भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानच्या रावळपिंडी, लाहोर, कराची आणि इस्लामाबाद या प्रमुख शहरांमध्ये रात्रीतून अचानक ब्लॅकआऊट करण्यात आलं. सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे ही शहरे काळोखाच्या विळख्यात गेली होती आणि नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं.
भारतीय सैन्याच्या कारवाईमुळे पाकिस्तान बिथरला
भारतीय सैन्याच्या अचूक आणि परिणामकारक कारवाईमुळे पाकिस्तान पूर्णपणे हादरला आहे. भारतीय लष्कराने रात्रीच्या अंधारात प्रवेश करून दहशतवादी लाँचपॅड उद्ध्वस्त केले. या कारवाईनंतर पाकिस्तानी सरकार गोंधळलेल्या अवस्थेत आहे आणि त्यांचे नेते भावनिक, परंतु पोकळ धमक्या देत आहेत.