Home Breaking News “क्रांतिवीर चापेकर स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते...

“क्रांतिवीर चापेकर स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भव्य सोहळा संपन्न!”

64
0

पिंपरी-चिंचवड शहराचा अभिमान आणि भारताच्या स्वातंत्र्य संग्रामातील पहिले क्रांतिकारक क्रांतिवीर चापेकर बंधूंच्या स्मृतीप्रित्यर्थ उभारण्यात आलेल्या भव्य क्रांतिवीर चापेकर स्मारक आणि राष्ट्रीय संग्रहालयाचे उद्घाटन आज महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले.

या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. अजित पवार होते. तसेच कार्यक्रमास उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. चंद्रकांत पाटील, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि नीतिमूल्य मंत्री मा. जयकुमार रावल, विधानसभेचे उपाध्यक्ष मा. अण्णा बनसोडे, खासदार मा. श्रीरंग आप्पा बारणे, आमदार मा. महेश लांडगे, मा. शंकर जगताप, मा. उमा खापरे, मा. अमित गोरखे, स्मारक समितीचे अध्यक्ष पद्मश्री मा. गिरीश प्रभुणे, पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंदवार, पोलीस आयुक्त मा. विनायक चौबे, महा मेट्रोचे मा. श्रवण हार्दिकर, आयुक्त मा. शेखर सिंह, जिल्हाधिकारी मा. जितेंद्र दुडी, पीएमआरडीएचे आयुक्त डॉ. योगेश म्हसे, अतिरिक्त आयुक्त मा. प्रदीप जम्भळे पाटील आणि मा. विजयकुमार खोरेटे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

विशेष म्हणजे चापेकर बंधूंचे वंशज श्रीमती तृप्ती संधभोर यांचाही या कार्यक्रमात सन्मानपूर्वक सहभाग होता.

या स्मारकात चापेकर बंधूंच्या कुटुंबीय जीवनाचा प्रातिनिधिक दोन मजली पारंपरिक लाकडी वाडा उभारण्यात आला आहे, ज्याचे क्षेत्रफळ सुमारे ३०० चौरस मीटर आहे. यामध्ये क्रांतिकारी घटनांचा जिवंत अनुभव देण्यासाठी आधुनिक एआर-व्हीआर (AR-VR) तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे.

पिंपरी चिंचवड शहराच्या मातीतील सुपुत्र आणि हिंदू राष्ट्राभिमानाचे प्रेरणास्थान असलेल्या या क्रांतिवीरांच्या गौरवशाली कार्याची माहिती पुढील पिढ्यांपर्यंत पोहचावी, या हेतूने उभारण्यात आलेले हे स्मारक म्हणजे देशभक्तीचा अमूल्य ठेवा आहे.

या ऐतिहासिक कार्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, पिंपरी चिंचवड महापालिका आणि क्रांतिवीर चापेकर स्मारक समितीचे मन:पूर्वक आभार मानण्यात आले. या स्मारकामुळे देशभक्तीची प्रेरणा नव्या पिढीपर्यंत पोहचेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.